राज्यातील १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय - जाणता राजा युवा प्रतिष्टान


राज्यातील १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतला आहे. तसेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं घेतला आहे. आज सोमवारपासूनच हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यानी स्पष्ट केले होते.

राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतलाय. प्रदूषण नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. १४४ कत्तलखान्यांपैकी १२८ छोटे कत्तलखाने, तर १६ मोठे कत्तलखाने बंद होणार आहेत.

No comments:

Post a Comment